फाऊंडेशनबद्दल
लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जपत स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आपले संपूर्ण जीवन कागल, गडहिंग्लज व उत्तूरवासियांसाठी समर्पित केले. आपल्या प्रत्येक सहकारी संस्थेला शाहू महाराजांचे नाव देऊन त्यांनी नवा आदर्श जपला. राजे विक्रमसिंह घाटगे यांचे कार्य पुढे नेण्याच्या हेतूने लोकहिताची कामे करणे व त्यातून समाजहित जपणे हा एकमेव उद्देश घेऊन ९ ऑगस्ट २०१७ रोजी राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हे फाऊंडेशन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, शेती व वैद्यकीय क्षेत्रात भरीव कार्य करत आहे.
पाणी व आरोग्य या मानवी जीवनातील मूलभूत गरजा आहेत. प्रत्येक गावात पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने फाऊंडेशनतर्फे जलयुक्त शिवार व जलसंधारणाच्या अन्य योजना राबविल्या जात आहेत. निरोगी व सशक्त समाज हा विकासाचा पाया आहे. यासाठी सर्व समाजघटकांचे आरोग्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे. याच विचाराने विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, आरोग्य केंद्रे चालविली जात आहेत.